स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फौंडेशन (SIRF,Solapur) महाराष्ट्र व
"माझी शाळा,माझा फळा" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
"अक्षरमित्र संमेलन"-राज्यस्तरीय कार्यशाळा 20 सप्टेंबर 2015 रोजी मातोश्री गिरीजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर येथे संपन्न झाली. यावेळी
*माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक मा.प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर

* मा.डॉ.ह ना जगताप सर
(शिक्षणतज्ञ)

* मा.श्री. प्रदीप मोरे साहेब
माजी उपसंचालक-पुणे विभाग

* मा.श्री. संजय राठोड साहेब
शिक्षणाधिकारी लातूर

* डॉ.समीना नदाफ मॅडम
प्राचार्या मातोश्री गिरीजाबाई ढोबळे अध्यापक विद्यालय,सोलापूर

* मा.श्री.सिद्धाराम माशाळे सर
 राज्यसमन्वयक सर फाऊंडेशन

 यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटत झाले.

*सर फौंडेशनचे राज्यसमन्वयक
मा.श्री.बाळासाहेब वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन सर फौंडेशनची माहीती दिली.

सर्व मान्यवरांनी आपले मनोगतपर मार्गदर्शन केले व एका उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर फ़ाउंडेशनचे अभिनंदन केले.
  यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षरलेखन उत्कृष्ट नमुने व फलकलेखन प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

अमित भोरकडे सरांनी अतिशय सोप्या शब्दांत अक्षर लेखन कसे करावे ते प्रात्यक्षिकातून दाखविले. उपस्थित प्रत्येकांकडून लेखन नमुना प्रात्यक्षिक करुन घेतले. सुरवसे प्रशाला येथील कला शिक्षक श्री.डोंगरी सर यांनीही लेखन कसे असावे याविषयी आपले अनुभव सांगितले. शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ.समीना नदाफ मॅडम यांनी आभार व्यक्त केले. हेमा शिंदे (वाघ) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

श्री. राजकिरण चव्हाण सर
श्री.एस.बी.सदाफुले सर
श्री.राजेंद्र काकडे सर
श्री.पैगंबर तांबोळी सर
श्री.राजेन्द्र कांबळे सर
व सर्व सर फाऊंडेशन टीमने सहकार्य केले.

       शब्दांकन- हेमा शिंदे (वाघ)

Post a Comment

Previous Post Next Post